
भारतीय ऋषिमुनींनी संस्कृतीचं महत्त्व भारतीयांच्या मनावर बिंबवलं. मानवाच्या आंतरिक शक्तीचा विकास होणं गरजेचं आहे,अन हा विकास मानवी शरीराच्या विकासातून होऊ शकतो, हे त्यांना जाणवलं होतं. त्यामुळेच खाण्याच्या, विश्राम करण्याच्या तसेच शरीराचं निकोपत्व कायम ठेवण्याच्या अनेक पद्धतींचा त्यांनी शोध लावला होता. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नांतून अन शोधांतून त्यांनी मानवी शरीराची व मनाची ताकद, सकसता अन पावित्र्य वाढविण्यासाठी कसरत व योगाच्या विशेष पध्दतींचा विकास केला होता. ऋषीमुनींनी स्पष्ट केलं की आपण देवाला प्राणायमाने प्राप्त करुं शकतो. कारण या अवस्थेत बुध्दी विचारांना शरण जाते, कुठलीही विघ्ने न येता आपण प्राणायमाने चित्त स्थिर करु शकतो, इथं आपल्या ऐच्छिकाशी, देवाशी तादाम्य पावण्याची स्थिती असते. सुर्याच्या तीन अवस्थांशी याचं देणं घेणं चालतं. सकाळी उठताना उगवत्या सुर्याची पूजा, जी दिवसाची कामे करायला प्रेरणा देते. दुपारचा सूर्य जेवणाने आपली शक्ती वाढवून काम करायला ताकद देतो तर संध्याकाळचा मावळता सूर्य म्हणजे त्या सर्व शक्तिमान परमेश्वराची कृपा, त्याचे आभार, कारण त्यानेच दिवसाची सर्व कामे पूर्ण केली. ऋषिमुनींच्या मते पहाटे तीन ब्रम्हमुहूर्त असतो, ज्यावेळी प्रकृती आपल्या सर्वोत्तम पावित्र्यात असते, प्राणायमासाठी ही उत्क्रुष्ट वेळ आहे.
No comments:
Post a Comment